कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या पदावर आयु. सतीश भारतवासी यांची नियुक्ती जाहीर…

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या पदावर आयु.सतीश भारतवासी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आंबेडकरी चळवळीत अत्यंत सक्रिय काम करीत आहे. आयु. सतीश भारतवासी हे कवी,लेखक, सामाजिक प्रबोधनकार असून आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक आंदोलनात सक्रिय आहेत. धम्म परिषद व विविध धार्मिक कामातून धम्माचा प्रचार व प्रसार करीत आहे. लेणी संवर्धनासाठी त्यांचे मोठे कार्य आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व न्यायालयीन लढ्यात मागील अनेक वर्षांपासून ते सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. सतीश भारतवासी जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *