कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या अहिल्यानगर (उत्तर) जिल्हा अध्यक्ष या पदावर सामाजिक कार्यकर्त्या आयु. संध्याताई खरे यांची नियुक्ती….

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या अहिल्यानगर (उत्तर) जिल्हा अध्यक्ष या पदावर सामाजिक कार्यकर्त्या आयु. संध्याताई खरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या यापूर्वी जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा होत्या त्यांना बढती देण्यात आली आहे. त्या मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. आयु. संध्याताई खरे या अत्यंत निर्भीड आणि आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांची अहिल्यानगर जिल्ह्यात ओळख आहे. महाकाया बुद्ध धम्म संस्था या संस्थेच्या माध्यमातून त्या धम्माचे कार्य करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात त्या मागील काही वर्षापासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. संध्याताई खरे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *