कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या अंबरनाथ शहर अध्यक्ष (महिला) या पदावर आयु. लताताई डोंगरे यांची नियुक्ती जाहीर…
मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या अंबरनाथ शहर अध्यक्ष (महिला) या पदावर आयु. लताताई डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. आयु. लताताई डोंगरे या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी महिला खूप मोठे काम केले. महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अंबरनाथ येथे मोठे काम केले असून फेरीवाले, व फुटपाथवर धंदे करणाऱ्यांच्या त्या नेत्या आहेत. गोरगरीब माणसांसाठी तसेच अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या त्या लढाऊ नेत्या आहेत. तसेच अंबरनाथ मध्ये खूप मोठे सामाजिक व धार्मिक काम केले आहे. बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार यासाठी ते नेहमी अग्रेसर आहेत. आंबेडकरी चळवळीचे ते क्रियाशील कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून अनेक सामाजिक, धार्मिक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. लताताई डोंगरे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
