मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष (महिला) आयुनी. सरिता चंद्रकांत कांबळे यांची पदोन्नती करून मुख्य कमिटीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष या पदावर नव्याने नियुक्ती करण्यात आली असून त्या मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. आयु. सरिता चंद्रकांत कांबळे या लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या असून अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांचा संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्था व संघटनेत विविध पदावर काम करीत आहे. तसेच धार्मिक कार्यात त्या अग्रेसर असून धम्माचा प्रसार आणि प्रसार करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात त्या मागील अनेक दिवसांपासून सहभागी असून प्रत्यक्ष काम करीत आहे. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. सरिता चंद्रकांत कांबळे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
