मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ठाणे जिल्हा (महिला) सोशल मीडिया प्रमुख या पदावर आयु. अनिता श्रीकांत टेंभूर्णीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्त्या आहेत. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केली आहेत. आक्रमक आणि लढाऊ तरुण कार्यकर्ता म्हणून त्या जिल्ह्यात परिचित आहेत. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सहभागी आहेत. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या त्या भगिनी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. अनिता श्रीकांत टेंभूर्णीकर जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
