मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या चेंबूर तालुका अध्यक्ष या पदावर आयु. जयेंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सुरुवातीपासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सहभागी आहेत.आयु. जयेंद्र भरत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते असून अनेक सामाजिक, धार्मिक संस्था मधून ते कार्यरत आहेत. आंबेडकरी चळवळीचे ते क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून अनेक सामाजिक, धार्मिक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. जयेंद्र भरत गायकवाड जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
