कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष या पदावर आयु. धम्मदीप प्रल्हाद बनसोडे यांची नियुक्ती…

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष या पदावर आयु. धम्मदीप प्रल्हाद बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. आयु. धम्मदीप प्रल्हाद बनसोडे हे विद्यार्थी संघटनेचे नेते असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते म्हणून ते परिचित असून प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभागी होतात. महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही वर्षापासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. धम्मदीप प्रल्हाद बनसोडे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *